सिनाचे पाणी सुटले कुकडीचे कधी सुटणार…

 

 

 सिना धरणाचे आवर्तन सुटले कुकडीचे पाणी कधी सुटणार याकडे शेतकरी वर्गाचे डोळे लागले आहेत, कुकडी लाभक्षेत्रातील फळबागा व पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे. गेल्या दोन आवर्तनापरमाणे यावेळी होणार नाही ना अशी शंका शेतकऱ्यांना सतावते आहे.   कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे सीना धरणातून पहिले उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आहे.एकूण पंचवीस दिवसांचा आवर्तन कालावधी असून टेल टू हेड होणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी  तथा कालवा सल्लागार समितीचे  सचीव बाजीराव थोरात यांनी दिली. ऐन उन्हाळ्यात उभ्या पीक व फळबागांना या मुळे जीवदान मिळण्या बरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने शेतकऱ्यांबरोबर प्रशासनाचा जीव भांड्यात पडला आहे.   कोरोना च्या पार्श्वभूमीवर  23 तारखेला कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली होती. या ऑनलाइन  झालेल्या बैठकीत एक एप्रिल रोजी सीना धरणातून उजव्या आणि डाव्या कालव्यातून पहिले  उन्हाळी आवर्तन सोडण्याचे निश्चित झाले.त्या नुसार आज सदर आवर्तन सोडण्यात आले आहे.सीना धरणाची 2400 दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असून सध्या 1311 दशलक्ष घनफुट पाणी साठा उपलब्ध आहे.एका अवर्तनासाठी 984 दशलक्ष घनफुट पाणी लागत असून दोन उन्हाळी आवर्तन पिकासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी सोडण्यात येणार आहेत.या अवर्तनात एकूण 1600 हेकटर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

सध्या उन्हाची काहिली वाढल्या मुळे विहिरी आणि कूपनलिका यांनी तळ गाठला होता तसेच पाण्याची टंचाई निर्माण होण्याची चिन्ह होती या मुळे शेतकरी वर्ग धास्तावला होता मात्र सदर आवर्तन सुटल्याने शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे तसेच संभाव्य टंचाई च्या भीतीने प्रशाकीय अधिकारी कर्मचारी यांचे

You might also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More

Privacy & Cookies Policy