महाराष्ट्र कृषी विभागात 2070 कृषी सेवकांची भरती , लगेच करा अर्ज !

महाराष्ट्र कृषी विभागात 2070 कृषी सेवक पदांची भरती (2070 Agricultural Servants Recruitment in Maharashtra Agriculture Department ) 

पुणे, 14 सप्टेंबर 2023: महाराष्ट्र कृषी विभागात 2070 कृषी सेवक पदांची भरती होणार आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 ऑक्टोबर 2023 आहे.

या भरतीमध्ये एकूण 2070 पदे भरली जाणार आहेत. त्यापैकी लातूर जिल्ह्यात 170, पुणे जिल्ह्यात 188, औरंगाबाद जिल्ह्यात 196, अमरावती जिल्ह्यात 227, कोल्हापूर जिल्ह्यात 250, ठाणे जिल्ह्यात 255, नाशिक जिल्ह्यात 336 आणि नागपूर जिल्ह्यात 448 पदे आहेत.

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शासनमान्य संस्था किंवा कृषी विद्यापीठामधील कृषी पदविका, कृषी पदवी किंवा समतुल्य शिक्षणाची आवश्यकता आहे. उमेदवाराची वयोमर्यादा 11 ऑगस्ट 2023 रोजी 19 ते 38 वर्षे आहे. मागासवर्गीय उमेदवारांना वयोमर्यादेत 5 वर्षे सूट देण्यात आली आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 1000 रुपये (खुला प्रवर्ग) किंवा 900 रुपये (मागासवर्गीय) परीक्षा फी भरावी लागेल.

या भरतीची अधिक माहिती महाराष्ट्र कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.

अधिकृत संकेतस्थळ : krishi.maharashtra.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel

Leave a Comment