Rajaram Maharaj death anniversary 2023 : जिंजी जिंकून राजाराम महाराजांना पकडण्यासाठी औरंगजेबाने जुल्फिकार खानास धाडले. इ.स. १६९० मध्ये खानाने जिंजीस वेढा दिला. तो ८ वर्षे सुरू राहिला. त्या काळात रामचंद्र पंडित, शंकराजी नारायण, संताजी, धनाजी या मंडळींनी राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली मुघल सैन्याला निकराची झुंज दिली. संताजी-धनाजींनी याच काळात गमिनी काव्याने लढून मुघलांना पुरते हैराण करून सोडले. नाशिकपासून जिंजीपर्यंत मराठ्यांच्या फौजा सर्वत्र संचार करू लागल्या.
अखेर इ.स. १६९७ या वर्षी जुल्फिकार खानाने जिंजी जिंकली. पण, तत्पूर्वीच महाराज किल्ल्यातून निसटले. महाराष्ट्रात येऊन त्यांनी मुघलांविरुद्ध मोठी धामधूम माजवली. शत्रूच्या प्रदेशावरील स्वारीत असताना त्यांचा प्रकृतीने घात केला आणि सिंहगडावर फाल्गुन वद्य नवमी, शके १६२१ (इ.स.१७००) या दिवशी छत्रपती राजाराम महाराज यांचे निधन झाले.
छत्रपती राजाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र आणि मराठा साम्राज्याचे चौथे सम्राट होते. त्याने 1727 ते 1839 पर्यंत राज्य केले. मराठा साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी त्यांनी अनेक यशस्वी मोहिमा सुरू केल्या, ज्यात त्यांच्या सैन्याला यश मिळाले. शिक्षण, कला, संस्कृती, धर्म या क्षेत्रातही त्यांनी विकासासाठी अनेक उपाययोजना केल्या. भारतीय इतिहासात छत्रपती राजाराम महाराजांचे नाव महत्त्वाचे स्थान आहे.