Pune : बेरोजगारीमुळे अडकलेली लग्नाची गाठ: तरुणांचे भविष्य धोक्यात !
Pune : आजच्या तरुण पिढीसमोर बेरोजगारी आणि अत्यल्प वेतन ही सर्वात मोठी आव्हाने ठरत आहेत. विशेषतः अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) सारखे उच्च शिक्षण घेतलेल्या अनेक तरुणांना नोकरी मिळत नाही आणि ज्यांना मिळते, त्यांचे मासिक वेतन इतके कमी असते की, त्यात नवरा-बायकोचा उदरनिर्वाह करणेही अशक्य होते. याचा थेट परिणाम त्यांच्या वैवाहिक जीवनावर होत आहे. अनेक वधू-पिते आपल्या मुली अशा तरुणांना देण्यास तयार होत नाहीत, कारण आर्थिक स्थैर्याचा अभाव ही एक मोठी चिंता बनली आहे.