---Advertisement---

छत्रपतींच्या पुतळ्याच्या कोसळण्यावरून रोहित पवारांचा भाजपवर गंभीर आरोप; फडणवीसांना केली तीव्र टीका !

On: August 28, 2024 6:17 PM
---Advertisement---

Pune : राजकोट किल्ल्यावरील छत्रपतींच्या पुतळ्याचे कोसळणे (Pune News )म्हणजे कामात झालेल्या दलालीचे द्योतक असल्याचा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला आहे. त्यांनी ट्विटरवरून भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. पवारांनी असा आरोप केला आहे की, पुतळ्याचे कोसळणे ही वस्तुस्थिती असून, या घटनेमुळे सरकारच्या भ्रष्टाचाराची पोलखोल होण्याची शक्यता होती.

रोहित पवारांनी पुढे असा आरोप केला की, भाजपने नेत्यांना पाठवून या ठिकाणी राडा घडवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य लपविण्याचा प्रयत्न झाला. मविआ (महा विकास आघाडी) चे नेते या ठिकाणी पाहणी करायला गेले असता, त्यांनी भाजपच्या गावगुंडांना पाठवून सरकारी भ्रष्टाचार उघड होऊ नये म्हणून अडथळे आणले.

सागर बंगल्याच्या संरक्षणामुळे पत्रकारांचे माईक हिसकावण्यापासून ते पोलीस अधिकाऱ्यांना अरेरावी करण्यापर्यंत मजल जायला लागली आहे, हे अत्यंत चिंताजनक असल्याचे रोहित पवार यांनी नमूद केले आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या गुलामगिरी करणाऱ्या गावगुंडांचा जाहीर निषेध केला आहे.

या टीकेमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, पुढे काय घडामोडी होतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

ladki bahin yojna form bhrun milele 8329865383

Editorial Team

Pune City Live या वेबसाईटचे आपल्या वेबसाईटसाठी विविध क्षेत्रांतील बातम्या आणि लेख लिहितात. त्यांच्या लेखणीतून पुण्यातील विविध घडामोडी, घडामोडींची विश्लेषणे, तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवरील माहिती वाचकांपर्यंत पोहोचवली जाते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment