letest News & updets in Pune

Manoj Jarange Patil : आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे ? राज ठाकरे काय म्हणाले ?

राज ठाकरेंचं जरांगे पाटील यांना अभिनंदन, आरक्षणाच्या प्रश्नावर पारदर्शकता येईल अशी अपेक्षा

Manoj Jarange Patil  : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण आंदोलनाला आज मोठे यश मिळाले. सरकारने जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत.

या निर्णयाचे स्वागत करीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जरांगे पाटील यांना अभिनंदन केले. त्यांनी ट्विट करत म्हटले की, “श्री. मनोज जरांगे पाटील यांना अभिनंदन. सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या. आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा, म्हणजे आपल्या मराठा बांधवांना, भगिनींना ही खरी परिस्थिती समजेल. लोकसभा निवडणूकी आधी पारदर्शकता येईल ही अपेक्षा.”

जरांगे पाटील यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी सांगितले की, “सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्याबद्दल आम्ही आनंदी आहोत. आम्ही या निर्णयाचा स्वागत करतो. मात्र, आरक्षणाच्या प्रश्नावर अजूनही पारदर्शकता नाही. लोकसभा निवडणूकी आधी हा प्रश्न सोडवला जाईल अशी आशा आहे.”

या निर्णयामुळे मराठा समाजात मोठी उत्साहाची लाट पसरली आहे.

Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel
Leave A Reply

Your email address will not be published.