Pune News : Stay up-to-date with the latest pune news and local news from Pimpri Chinchwad with Pune City Live . Explore latest updates from Politics news, entertainment to crime news.

दौंड शहरातील सरकारी कत्तलखान्या विरोधात वारकरी संप्रदायाचा विराट मोर्चा; पर्यावरण आणि हिंदू धर्माच्या रक्षणाची मागणी !

दौंड, पुणे जिल्हा:
दौंड शहरातील सरकारी कत्तलखान्या विरोधात वारकरी संप्रदायाने आणि समस्त हिंदू समाजाने विराट मोर्चाचे आयोजन केले आहे. हे बूचडखाने महाराष्ट्र सरकारने मंजूर केले असून, अत्याधुनिक यंत्रांसह या प्रकल्पाचे बांधकाम २०१७ मध्ये पूर्ण झाले. या बूचडखान्यात दररोज ५०० ते १००० जनावरांचा वध केला जाणार आहे आणि त्यासाठी राज्यभरातील लाखो जनावरे येथे आणली जाणार आहेत.

विशेष म्हणजे, दौंड हे तीर्थस्थान असून, भीमा नदीच्या काठावर वसलेले आहे, जेथे ऋषी धौम्य यांनी तपश्चर्या केली होती. बूचडखान्यातून होणारा जनावरांचा रक्तस्राव आणि त्याचे अशुद्ध पाणी भीमा नदीत मिसळले जाऊ शकते, ज्याचा परिणाम पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यातील लाखो हिंदू नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यावर होईल.

याविरोधात वारकरी संप्रदायाने ७ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता दौंड शहरात विराट मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चाद्वारे शासनावर दबाव आणून बूचडखाना बंद करण्याची मागणी केली जाणार आहे. वारकरी संप्रदाय आणि हिंदू समाजाने प्रसारमाध्यमांना या मोर्चाचे वृत्त प्रसारित करण्याची विनंती केली आहे.

आपला निष्ठावान,
वारकरी संप्रदाय आणि समस्त हिंदू समाज, दौंड.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More